Close Visit Mhshetkari

Car Insurance: कार इन्शुरन्स घेताना लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी; नक्कीच होईल फायदा!

Car Insurance : नमस्कार मित्रांनो प्रत्येकाचे एक स्वप्न असते की आपल्याकडे कार पाहिजे कार खरेदी करताना विमा इन्शुरन्स सर्वात महत्त्वाचा राहतो. तुम्ही जर कार विमा घेतला नसेल तर  भारतात एक मोठा गुन्हा मानला जातो.

प्रत्येकाला आपल्या वाहनाचा विमा काढणं अनिवार्य राहते नवीन कार घेत असताना सर्व प्रकारचा विमा इन्शुरन्स काढला जातो.

कारचा विमा असणे खूप आवश्यक आहे. या तुम्ही जर तुमच्या कारचा किंवा वाहनाचा विमा काढला असेल तर यामुळे तुम्हाला अपघात चोरी व इतर कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास आर्थिक नुकसान होण्यापासून तुमचे संरक्षण होऊ शकते. कायदेशीर दृष्टिकोनातून हे एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते.

तुम्ही जर नवीन कार खरेदी केली तर तिचा अपघात झाला किंवा इतर कोणत्याही समस्या आल्या तर विम्यात द्वारे नुकसान मोफत भरून मिळते त्याचवेळी आजच्या काळात कार पॉलिसी  विकणाऱ्या आणि कंपन्या आहेत . कार किंवा वैयक्तिक वाहनाबरोबर इन्शुरन्स घेणे अनिवार्य आहे. यामुळे इन्शुरन्स कंपन्यांचे नियम हा इन्शुरन्स घेताना काय खबरदारी घ्यायला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या लेखांमध्ये पाहूया.

कार विम्याबद्दल ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

कार खरेदी करताना त्याचा विमा काढणे गरजेचे आहे कार विमा असल्याने ग्राहकांना प्रत्येक प्रकारचे फायदे मिळवता येतात.कार मध्ये कोणत्याही प्रकारचे डॅमेज होण्याच्या स्थितीमध्ये लोकांसाठी नुकसान भरपाई मिळू शकते.

तर तुम्ही ते विमा संरक्षण घ्यायला पाहिजे. परंतु पॉलिसी घेताना प्रत्येक गोष्टीची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. वाहनाच्या इन्शुरन्स मुळे विविध प्रकारचे संरक्षण मिळत असते.

तुमच्या वाहनांचा इन्शुरन्स आहे. का नाही याविषयी खात्री करून घ्यायला पाहिजे. आणि त्याची जर मुदत संपली असेल तर त्याचे परत नूतनीकरण करून घ्यायला पाहिजे.

भारतीय रस्ता सुरक्षा कायदा व भारतीय मोटर वाहन कायदा यानुसार रस्त्यावर वाहन चालवण्यासाठी विमा पॉलिसी घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि कारचा विमा काढत असताना तुम्ही तुमच्या गरजा समजून घेणे देखील महत्वाचे राहते.

मी ज्यावेळेस विमा पॉलिसी घेत असता त्यावेळेस तुम्हाला कोणत्या प्रकारची पॉलिसी हवी आहे . म्हणजे भारतामध्ये दोन प्रकारच्या विमा पॉलिसी आहेत. ज्या तुम्हाला थर्ड पार्टी व सर्व समावेशक विमा विषय आहे. अशा दोन प्रकारच्या वाहनासाठी चांगलं देणाऱ्या विमा निवडावा.

भारतातील दोन प्रकारच्या विमा पॉलिसी कोणत्या

1. थर्ड पार्टी इन्शुरन्स

या विम्या विमा प्रकारामध्ये कंपनी दुसऱ्या पक्षाच्या नुकसानीची भरपाई करत असते. तुम्हाला सांगायचे झाल्यास दुसऱ्या गाडीचे झालेले नुकसान विमा कंपनी नुकसान भरपाई म्हणून देते 1988 च्या वाहन कायद्यानुसार हे अनिवार्य आहे. मोटार वाहन कायद्यानुसार हा विमा सर्व वाहनांना अनिवार्य ठरतो मात्र या विम्यातून तुमच्या स्वतःच्या गाडीला झालेले नुकसान तुम्हाला स्वखर्चाने भरून काढावे लागते.

2 सर्वसमावेशक विमा

या विमा प्रकारामध्ये विमा कंपनी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरपाई देते सर्वसमावेशक का विमा पॉलिसीमध्ये पॉलिसी धारकाला जास्तीत जास्त कव्हरेज मिळून देते. व हे तृतीयपक्षदायित्व वाहनाचे नुकसान वैयक्तिक अपघात कव्हर वादळपूर, आग ,चोरी यासारख्या सर्व प्रकारच्या गैरटकर नुकसानीसाठी ही पॉलिसी संरक्षण प्रदान करत असते.

तुम्ही ज्यावेळी विमा पॉलिसी खरेदी करता त्यापूर्वी CSR म्हणजे प्रेम सेटलमेंट रेशो तुम्ही तपासून घेतलं पाहिजे. यामुळे तुम्हाला समजून येते .की विमा कंपनीने किती दावे यशस्वीरित्या पूर्ण केले आहे आणि त्या कंपनीने जर आपले दावे पूर्ण केले असतील तर तुम्ही त्या कंपनीकडून विमा घेऊ शकते.

Car Insurance benifits 

1 कार विमा पॉलिसीमुळे तुम्हाला आर्थिक संरक्षण मिळते.

2 अपघात, दंगल, चोरी, दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती आणि आग, स्फोट, पूर, वादळ, भूकंप इत्यादी आपत्तींमुळे वाहनाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते

3 कार विमा पॉलिसी घेतल्यामुळे कायदेशीर संरक्षण देखील मिळते. जर  कार विमा पॉलिसीमुळे या कायदेशीर कारवाईचा खर्च कमी होण्यास मदत होते.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment