IMD Weather Update आपल्याला दिसूनच आले आहे ती महाराष्ट्र मध्य प्रदेश अनेक ठिकाणी या पावसाचे प्रमाण हे कमी आहे गेले कितीतरी दिवस पाऊस ऑगस्ट महिन्यात पाऊस पडलाच नाही आजपासून चांगला पाऊस बरचण्याची शक्यता आहे काय मेट वेदर या खाजगी हवामान अंदाज एजन्सी सहकारी हवामान खात्याने वर्तवलेला आहे
हवामान खात्याच्या अंदाजानुसार
कोकणासह मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी आज चांगला पाऊस होण्याची दाट शक्यता आहे उपसागरावर निर्माण झालेला कमी दाबाचे क्षेत्र आणि उत्तर कर्नाटकातील वादळाचा हा अनुकूल परिणाम आपल्याला दिसून येणार आहे
हवामान खात्याने याविषयी नुकता च सविस्तर अंदाज वर्तवला आहे या नवीन हवामान अंदाजानुसार उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आणि या कारणामुळे आपल्याला राज्यांमध्ये पाऊस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे याच्या प्रभावाने आता राज्यातील काही जिल्हे जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार असा अंदाज 6 सप्टेंबर पर्यंत वर्तवला आहे
पाऊस सरासरीपेक्षा कमी
ऑगस्ट महिना कोरडा गेल्यामुळे पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आपल्याला दिसून येत आहे आता सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असून तसेच राज्यात सरासरी होऊन कमी पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग चिंचेच सापडला आहे.
हवामान खात्याचा अंदाजानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होऊन दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे मात्र पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा यावर्षी कमी असेल असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस
6 सप्टेंबरला उत्तर कोकणातील ठाणे, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर, विदर्भातील भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, या जिल्ह्यामध्ये पाऊस जोरदार पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.
7 सप्टेंबरला , मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
लवकर मिळणार चांगली बातमी
मान्सूनचा हा सक्रिय टप्पा कमी होईपर्यंत, बंगालच्या उपसागरावर आणखी एक नवी मान्सून प्रणाली दिसू शकते. उत्तर आराकान किनारा आणि बंगालच्या उपसागराच्या जवळ एक नवे चक्रवाती परिवलन विकसित होत असल्याचे दिसत आहे. ही सिस्टीम मजबूत झाल्यास तिचाही महाराष्ट्राला फायदा होऊ शकतो.