Close Visit Mhshetkari

खूशखबर…कापूस भाव वाढण्याचे संकेत Kapus Bajar Bhav

Kapus bhav : कापसाचे बाजार भाव गेल्या दिवसात तुमच्यापासून लपून राहिलेले नाहीत.गेल्या अनेक दिवसांपासून बाजार तेजीत असून आता ते जवळपास स्थिर झाला आहे. पण तुमच्यापैकी अनेक बांधवांना कापसाचे पुढे काय होणार हे जाणून घेण्याची खूप इच्छा असेल.

Kapus bajar bhav
Kapus bajar bhav

Kapus Bajar Bhav

भारतीय कापूस आयातदार (India Cotton Importer) सुतगिरण्या आणि निर्यातदार (Cotton Exporter) यांच्यातील वाद काही संपायचं नाव घेईना. इंटरनॅशनल काॅटन एक्सचेंज (International Cotton Exchange) अर्थात आयासीएने वेळेत डिलेव्हरी मिळाली नाही म्हणून करार रद्द होत नसल्याचे सांगितले. त्यामुळं अशा निर्यातदारांसोबत भविष्यात करार करायचे नाहीत,असं आयातदारांनी ठरवल्याचं सुत्रांनी सांगितलं. तसचं भारतीय आयातदारांनी केलेल्या आरोपांवरूनही आयसीएनं नाराजी व्यक्त केलीये.

कापूस बाजार भाव

जागतिक बाजारात कापसाचा तुटवडा होता. त्यातच वापर वाढल्यानं दरही वाढले होते. त्यामुळं भारतीय आयातदारांनी १ लाख रुपये प्रतिखंडीनं कापूस आयीतचे करार केले. एक कापूस खंडी ३५६ किलोची असते. तमिळनाडूतील सुतगिरण्यांनी तब्बल ४०० कोटी रुपये किमतीचे कापूस आयातीचे करार केले आहेत. करार करताना १५ टक्के रक्कम आघाऊ दिली.म्हणजेच ६० कोटी रुपये निर्यातदारांना दिले आहेत.पण कापसाची वेळेत डिलेव्हरी मिळत नाही.मार्च आणि एप्रिल महिन्यात संपलेल्या कराराचा कापूस अद्यापही सुतगिरण्यांना मिळाला नाही.

वाणिज्य मंत्रालयानं देशात यंदा जवळपास ४० लाख गाठी कापूस अतिरिक्त असल्याचं म्हटलंय. मागील हंगामातील ७१.८१ लाख गाठी कापूस शिल्लक होता.तर उत्पादन ३१५.४३ लाख गाठी झालं. म्हणजेच केवळ देशातीलच कापूस पुरवठा ३८७.२७ लाख गाठी झाला.भारताने यंदा ४२ लाख गाठींची निर्यात केली. तर आयात १५ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी ३२१ लाख गाठी कापूस वापर होईल.त्यानंतरही ३९.२७ लाख गाठी कापूस देशात शिल्लक राहील,असं वाणिज्य मंत्रालयाचं म्हणणं आहे.

हे पण पहा --  Cotton farming यावर्षी कसे असतील कापूस बाजार भाव ? भाव वाढण्याचे कारणे काय आणि केव्हा विकावा कापूस पहा सविस्तर माहिती

कापूस निर्यातदार  आणि आयसीए करार रद्द

देशात उद्योगांना पर्याप्त कापूस असेल.मागील पाच वर्षात कापड उद्योगाकडून वापर होणारा ९० टक्के कापूस देशातच पीकतो. केवळ ५ ते १० टक्के कापसाची आयात केली जाते.आयात कापूस हा अतिरिक्त लांब धाग्याचा असतो. या कापसाची इजिप्त, सुदान, अमेरिका आदी देशांतून आयात होते, असंही वाणिज्य मंत्रालयानं स्पष्ट केलं.

निर्यातदार कापूस वेळेत देत नाही आणि आयसीए करार रद्द करत नाही,त्यामुळं कापूस आयातदार आक्रमक झाले आहेत. वेळेत कापूस दिला नाही आणि करार रद्द करण्यास नकार देणाऱ्या आयसीएच्या सदस्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. अशा निर्यातदारांसोबत यानंतर कापूस आयातीचे करार करायचे नाही, असं आयादारांनी ठरवले,असे तमिळनाडू सुतगिरणी असोसिएशनने म्हटले आहे.(कापूस निर्यातदार  आणि आयसीए करार रद्द)

कापसाचे  बाजार भाव वाढण्याचे संकेत

कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारासह देशांतर्गत बाजारात देखील कापसाला मागणी कायम राहण्याची शक्यता आहे.सूत गिरण्यांमध्ये वाढ झाली आहे.गुजरातमध्ये ५० लाख गाठींची गरज होती;

मात्र आता हीच मागणी १ कोटी गाठींपर्यंत पोहोचली आहे.जानेवारीपूर्वी ५२ हजार रुपये प्रति खंडी असलेल्या कापूस दराने आता लाखावर उसळी घेतली आहे.इतकी दरवाढ होऊनही कापसाची उपलब्धता कमी प्रमाणात आहे.देशभरातील सूतगिरण्यांना उत्पादन बंद करण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment