Agri Stack App : नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिशय कमी वेळात म्हणजे अवघ्या दहा मिनिटात कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे तर काय आहे योजना आणि कोणत्या शेतकऱ्यांना होणार याचा फायदा पाहूया सविस्तर माहिती
ॲग्री स्टॅक मोबाईल ॲप
केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यांमध्ये एक अनोखा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. ॲग्री स्टॅक ॲपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटांमध्येच दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होणार आहे.
विशेष म्हणजे सदरील कर्ज आहे विनातारण असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा होणार आहे. महाराष्ट्रातील बीड व उत्तर प्रदेशातील फारुखाबाद या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प येत्या मे महिन्या पासून राबविण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून गेल्या दोन वर्षांपासून ई- पीक पाहणी अर्थात पिकांची KISAN CARD किसान कार्ड,RuPay ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी एक ॲप विकसित केले आहे. आता याच मोबाईल ॲपच्या धर्तीवर केंद्र सरकारनेही सबंध देशासाठी एकाच आमच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे.
Satbara Aadhaar link Benefits
सातबारा उतारे जोडले ‘आधार’ला
पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांचे बैंक खाते आधार कार्डशी संलग्न करण्यात आले आहे. तसेच, सर्व जमीन नोंदीही तपासण्यात येऊन त्याची सत्यता पडताळण्यात आलेली आहे.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत ६५ % सातबारा उतारे ‘आधार’ला जोडण्यात आले आहेत.शेतीसाठी कर्ज देण्याची प्रक्रिया सुरळीत व्हावी किंवा सुलभ व्हावी यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचललेले आहेत.आता आगामी मे महिन्यापासून सदर प्रकल्पास प्रत्यक्ष सुरुवात होणारा असून निश्चितच शेतकऱ्यांना बँकेतील माराव्या लागणाऱ्या चक्रापासून दिलासा मिळणार आहे.
How to apply Kisan credit loan
- ॲग्री स्टॅक ॲप डाऊनलोड केल्यानंतर नाव आणि आधार क्रमांक टाकल्यावर ओटीपीतून पडताळणी करण्यात येईल.
- त्यानंतर फेस आयडी च्या माध्यमातून शेतकऱ्याची खात्री पाठवण्यात येईल.
- आता या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याला कर्ज हवे असल्यास तशी माहिती भरून बँक खाते असलेल्या बँकेकडून कर्जाची ऑफर प्राप्त होईल.
- सदरील ऑफ फरशी करून दहा मिनिटाच्या आत प्रक्रिया पूर्ण करून रक्कम शेतकऱ्याच्या बँक अकाउंट मध्ये जमा होईल.
- किसान कीडच्या माध्यमातून एक लाख 60 हजार रुपयापर्यंत कर्ज विनाकारण देण्यात येणार आहे.