Close Visit Mhshetkari

Pitru Paksha : पितृपक्षात चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका,जाणून घ्या महत्त्व आख्यायिका सर्व माहिती

Pitru Paksha : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे.भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंधरा दिवसांना पितृ पक्ष म्हणतात.पितरांचे ऋण फेडण्याचा हा काळ असतो. पितृ पक्ष किंवा श्राद्ध पक्ष यावर्षी 10 सप्टेंबरपासून सुरू होत असून 25 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.तसेच पितृ पक्षातील संपूर्ण 16 दिवस तिथीनुसार पितरांचे पिंड दान केले जाते.आई-वडील आणि पूर्वजांच्या निधनानंतर त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्रद्धेने केलेल्या या विधीला पितृ श्राद्ध (Pitru Shradha)म्हणतात.

Pitru paksha
Pitru paksha

Pitru Paksha vidhi in marathi

हिंदू धर्मातपितृपक्षाला विशेष महत्त्व आहे.पितृपक्षात पूर्वजांचे पूर्ण भक्तीभावाने स्मरण केले जाते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.असे मानले जाते की, पितृपक्षात पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते.पितृपक्षात पिंड दान आणि श्राद्ध हे पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जातात.हे केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन आपल्या वंशजांना सुख-समृद्धीचसुख-समृद्धी आशीर्वाद देतात.

वडील आणि पूर्वजांच्या निधनानंतर त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्रद्धेने केलेल्या या विधीला पितृ श्राद्ध (Pitru Shradha) म्हणतात. पितृपक्ष हा पितरांच्या स्मरणाचा काळ आहे.त्यामुळे या काळात शुभ कार्य,खरेदी आणि तीर्थयात्रेला विराम देण्यात येत असतो.

श्राद्धशी संबंधित आख्यायिका

जेव्हा महाभारत युद्धात महान दाता कर्णाचा मृत्यू झाला,तेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात गेला, जिथे त्याला अन्न म्हणून सोने आणि रत्ने अर्पण करण्यात आली.तथापि,कर्णाला खाण्यासाठी खऱ्या अन्नाची गरज होती आणि त्याने स्वर्गाचा अधिपती इंद्राला अन्न म्हणून सोने देण्याचे कारण विचारले. इंद्राने कर्णाला सांगितले की त्याने आयुष्यभर सोने दान केले,पण श्राद्धात आपल्या पितरांना कधीही अन्न दिले नाही.”श्राद्धशी संबंधित आख्यायिका

हे पण पहा --  Pitru paksha niyam पातृपक्षात कोणत्या दिवशी पितरे घालावे,जाणून घ्या निमम,तिथी,आख्यायिका

कर्ण म्हणाला की तो त्याच्या पूर्वजांपासून अनभिज्ञ असल्यामुळे त्याने कधीही त्याच्या स्मरणार्थ काहीही दान केले नाही.सुधारणा करण्यासाठी,कर्णाला 15 दिवसांच्या कालावधीसाठी पृथ्वीवर परत येण्याची परवानगी देण्यात आली,जेणेकरून तो श्राद्ध करू शकेल आणि त्याच्या स्मरणार्थ अन्न आणि पाणी दान करू शकेल.हा काळ आता पितृ पक्ष म्हणून ओळखला जातो.

पितृपक्षात चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका

1) पितृपक्षामध्ये  15 दिवस घरात सात्विक वातावरण असावे.या काळात घरात मांसाहार (Nonveg) करुन खाऊ नये.

2) पितृपक्षात श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने 15 दिवस केस आणि नखे कापू नयेत.

3) असे मानले जाते की पितृ पक्षाच्या काळात पूर्वज पक्ष्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात.त्यामुळे या काळात पक्ष्यांना त्रास देऊ नये तसेच पितृपक्षात पशु-पक्ष्यांची सेवा करावी.

4) पितृपक्षाच्या काही शाकाहारी पदार्थ खाणे देखील टाळावे.या दिवसात काकडी,हरभरा,जिरे आणि मोहरी,हिरव्या भाज्या खाऊ नयेत.

5) पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य करू नये.पितृ पक्षात लग्न, साखरपुडा आणि गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्य करु नयेत. पितृपक्षात शोकाचे वातावरण असते,त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करणे अशुभ मानले जाते.

टिप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment