Close Visit Mhshetkari

Crop Damage Compensation शेतकऱ्यांना नुकसानीच्या पंचवीस टक्के भरपाईसाठी अधिसूचना जारी

Crop Damage Compensation : भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम अंतर्गत उपरोक्त 5 कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासनास हिस्सा अनुदानाची मागणी केली आहे.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation

Crop Damage Compensation

खरिप हंगाम 2022 जुलै व ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन खरिपातील पिकांसह बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.याबाबत कृषी विभागाकडून सोयाबीन (Soybean),कापूस (Cotton),तूर व ज्वारी या चार पिकांचे 60 ते 68 टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता.यानुसार शेतकऱ्यांना नुकसानीच्या पंचवीस टक्के भरपाईसाठी (Crop Damage Compensation 2022) अधिसूचना जारी करून विमा कंपनीसह शासनाला कळविले आहे.

एनडीआरएफच्या नियमानुसार 6800 रुपये मिळत होते. त्यापेक्षा दुप्पट म्हणजे 13600 रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्याचा निर्णय घेतला होता.या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.आता अशी मिळणार मदत.

•• जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर प्रति हेक्टरी 6800 वरून वाढवून प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये.

•• बागायत शेतीसाठी प्रति हेक्टरी 13 हजार 500 रूपयांवरुन 27 हजार रुपये

•• बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर 18 हजार रूपयांवरून 36 हजार रुपये

Ativrushti Nuskan Bharpai

केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार चालू हंगामातील नोंदणी सुरू असतानाच विमा संरक्षित क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध नसली तरी देखील केंद्रा व राज्य शासनाचा विमा हप्ता हिस्सा हा ग्रीन स्वरूपात पहिला हप्ता कंपनीत अदा करणे आवश्यक आहे.त्यानुषंगाने आयुक्त कार्यालयाने पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून 842,17,84,541/ इतकी रक्कम पिक विमा हप्ता अनुदानापोटी विमा कंपन्यास अदा करण्यात आली आहे.

हे पण पहा --  Crop insurance : खुशखबर...1 रुपयात पीक विमा योजना शासन निर्णय आला! पहा कोणाला मिळणार लाभ

खरीप हंगाम 2022 मध्ये विविध भागांमध्ये राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झालं आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या 7 लाखांपेक्षा शेतकऱ्यांनी पीकविमा भरला असून त्यांनी नुकसान भरपाई साठी दावा देखील दाखल करण्यात आला आहे.शेतकऱ्यांच्या खात्यात 5 सप्टेंबरपासून निधीचे वाटप सुरु झाले आहे. “Ativrushti Nuskan Bharpai yadi 2022”

Crop insurance news

जुलै,ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात मुसळधार पावसाने खरिपातील सर्वच पिकाचे जसे सोयाबीन,कापूस,उडीद, तूर,मूग खरिपातील ज्वारी या पिकांची नुकसान झाले.तर काही जिल्ह्यात सरासरीच्या 134 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या अहवालानुसार 9 लाख 10 हजार शेतकऱ्यांनी खरिपातील सहा पिकांसाठी पिक विमा Crop Insurance भरला होता.भरपाईसाठी शेतकऱ्यांनी 4 लाखाच्या जवळ नुकसानी बाबत दावे दाखल केले आहेत.

सात लाख शेतकऱ्यांचे सव्वापाच लाख हेक्टरवरील पिकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने राज्य शासनाला कळविला होता.याबाबत शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 718 कोटी रुपये मंजूर केले आहेत.जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीतील अतिवृष्टी,पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली होती.

शंखी गोगलगाय नुकसान भरपाई

दरम्यान शंखी गोगलगायीमुळे ज्या शेतकरी बांधवाच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना वाढीव दरानेमदत दिली जाणार असून पिक नुकसान होणाऱ्यांची संख्या 1 लाख 18 हजार 996 एवढी आहे.

बाधित झालेल्या शेतकरी बांधवांसाठी 98 कोटी 58 लाख रुपयांची “शंखी गोगलगाय नुकसान भरपाई” मंजूर मदत ताबडतोब वितरित करावी असा आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आला आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment