Close Visit Mhshetkari

cotton price : यावर्षी पण कापूस विक्री विक्रमी दराने सरु!

Cotton price : देशात कापूस लागवडीखालील क्षेत्र वाढले असले तरी उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या आर्थिक वर्षांत भारतासह जगभरात कापूस टंचाई जाणवणार आहे का? कापड उद्योग (cotton industry) अडचणीत येण्याची शक्यता आहे का? याचा परिणाम कापूस बाजार भावावर दिसायला लागला आहे.

Cotton price
Cotton Market Rates

Cotton Market Rates

MCX फ्युचर्स मार्केटमध्ये आज 1 8 ऑगस्ट रोजी कापसाच्या किमतीत (Cotton Market Rates)मोठी वाढ झाली आहे,MCX कॉटनच्या 30 ऑगस्टच्या फ्युचर्स डिलिव्हरी कॉन्ट्रॅक्टची किंमत 2 टक्क्यांनी वाढली आहे,म्हणजे मागील ट्रेडिंग दिवसाच्या तुलनेत 990 रुपयांची वाढ दिसून आली आहे.जर आपण खाजगी बाजार भावाबद्दल बोलायचे झाले तर,आज हरियाणाच्या आदमपूर मंडईमध्ये नरमा कापूस 11700 ते 11800 रुपये,होडल मंडईमध्ये 10800 नवीन नरमा आणि उत्तर प्रदेशच्या मथुरा मंडईमध्ये नरमा (कापूस) 9500-11000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकला गेला आहे.

अमेरिकन आजचे कापूस बाजार भाव

जर आपण ‘अमेरिकन आजचे कापूस बाजारा भाव’ बद्दल बोललो,तर आज आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे भाव वाढलेले नोंदवले गेले. तथापि, बातमी लिहिण्याच्या वेळी, यूएस कॉटन #2 फ्युचर्स – 22 डिसेंबर (CTZ2) फ्युचर्स 0.09 (-0.11%) च्या किंचित घसरणीसह 116.74 स्तरावर व्यवहार करत आहे.

हे पण पहा --  Cotton rate शेतकऱ्यांसाठी खुशखबर...व्यापाऱ्यांकडून कापसाची ॲडव्हान्स् बुकिंग सुरू,यंदा पण वाढणार कापसाचा भाव !

बांगलादेश कापसाचा मोठा आयातदार

स्वस्तात मजूर उपलब्ध असल्यामुळे, बांगलादेशात कापड उद्योगाचा मोठा विस्तार झाला आहे. चीनने येथील उद्योगात मोठी गुंतवणूक केली असली तरी, तेथे कापसाचे उत्पादन फारसे होत नाही. भारत, अमेरिका आणि आफ्रिकी देशातून होणाऱ्या आयातीवरच हे उद्योग चालतात. या उद्योगांना वर्षांला सुमारे एक कोटी गाठींची आवश्यकता असते. त्याचा परिणाम म्हणून भारतातील कापूस दरात तेजी राहील,असे चित्र आहे.

भारतातील कापड उद्योगाची गरज किती ?

देशातील कापड उद्योगाची एकूण मागणी सुमारे ३२० लाख गाठी इतकी असते.त्यामुळे देशातील शेती क्षेत्राकडून उद्योगाची कापूस गरज भागवली जाईल. त्यामुळे कापूस आयात करावा लागेल, अशी स्थिती येण्याची शक्यता नाही. मात्र, शेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनकडून कापसाची मागणी वाढली की, त्याचा परिणाम देशी उद्योगावर लगेच दिसून येतो. आजघडीला देशात सुमारे ४० लाख गाठींचा साठा आहे. तरीही कापड उद्योगाला कापूस टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment